Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेव्हा रामाने विजय मिळवण्यासाठी रावणाकडून पूजा करवली

Webdunia
विजयादशमी पौराणिक कथा Vijayadashmi Pauranik Katha
* रावणाने रामाला विजयी होण्याचा आशीर्वाद का दिला?


लंकेचा राजा रावण हा एक महान विद्वान आणि ज्ञानी व्यक्ती होता हे सामान्यतः लोकांना माहीत आहे. असे मानले जाते की शिवभक्त रावणाने भगवान शंकराची पूजा करताना अनेक ग्रंथ रचले. त्यापैकी शिवतांडव स्तोत्र ही सर्वात महत्वाची आणि लोकप्रिय रचना मानली जाते. असे म्हणतात की रावणाचे ज्ञान भगवान रामाला चांगलेच माहीत होते. असे म्हणतात की लंका जिंकण्यापूर्वी त्यांनी रावणाची पूजा केली होती. मात्र आजही बहुतांश लोकांना याची माहिती नाही. भगवान श्री राम आणि रावण यांच्याशी संबंधित या कथेबद्दल जाणून घेऊया.
 
पौराणिक कथेनुसार रावण महान विद्वान असण्यासोबतच ज्योतिषशास्त्राचाही मोठा पंडित होता. असे म्हणतात की जेव्हा भगवान राम लंकापती रावणाशी युद्ध करत होते, तेव्हा त्यांनी रामेश्वरामध्ये शिवलिंग बांधून त्याची पूजा करण्याचा विचार केला होता. रामेश्वरम शिवलिंगाच्या पूजेसाठी मोठ्या पंडिताची गरज होती. प्रभू श्रीरामांनी लोकांना विद्वान पंडिताबद्दल विचारले तेव्हा सर्वांनी एकाच स्वरात सांगितले की, रावणापेक्षा मोठा विद्वान कोणी नाही. असे म्हणतात की हे जाणून भगवान श्रीरामांनी रावणाला शिवाची पूजा करण्याचे आमंत्रण पाठवले.
 
सर्वांना माहित आहे की रावण एक महान विद्वान असण्यासोबतच भगवान शिवाचा महान भक्त देखील होता. रावण भगवान शिवाचा भक्त असल्याने पूजा नाकारू शकत नव्हता. रावणाने रामेश्वरम येथे येऊन शिवपूजा केली होती, अशी पौराणिक मान्यता आहे. पूजेच्या शेवटी भगवान श्रीरामांनी युद्धात विजयासाठी रावणाकडून आशीर्वाद मागितला. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या वेळी पंडित म्हणून उपस्थित असलेल्या रावणानेही त्यांना विजयी भवाचे वरदान दिले होते.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments