Festival Posters

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

Webdunia
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी तांब्याची भांडी वापरणे. अनेक विद्वानांप्रमाणे तांबा पूर्णपणे शुद्ध धातू आहे. कारण तांबा निर्मित करण्यासाठी इतर धातू यात मिसळली जात नाही. तांब्याची भांडी वापरण्यामागील कारण एक कथेत वर्णित आहे.
 
वराह पुराण प्रमाणे पूर्वी गुडाकेश नावाचा राक्षस होता. राक्षस असला तरी तो प्रभू विष्णू यांचा मोठा भक्त होता. प्रभू विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तो कठोर तप करत असे. त्याचा तप बघून प्रसन्न होऊन एकदा विष्णू त्यासमोर प्रकट झाले आणि वर मागायला सांगितले.
 
त्या दरम्यान गुडाकेशाने विष्णूंकडे वर मागितले की- आपल्या चक्राने माझ्या मृत्यू व्हावा आणि माझं पूर्ण शरीर तांब्यात परिवर्तित व्हावे. त्या तांब्याचा वापर पूजेसाठी वापरण्यात येणार्‍या भांडीत व्हायला हवं आणि त्या धातूच्या भांड्याने आपली पूजा केल्यास आपण प्रसन्न व्हावे. यामुळे तांबा अत्यंत पवित्र धातू होईल.
 
प्रभू विष्णूंनी गुडाकेशाला वर दिले आणि वेळ आल्यावर चक्राने त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ज्यानंतर गुडाकेशाच्या मासाने तांबा, रक्ताने सोनं आणि हाडांनी चांदी निर्मित झाली. या कारणामुळे प्रभूच्या पूजनात नेहमी तांब्याची भांडी वापरणे सुरू झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

Sati Baijabai Yatra 2026 श्री गजानन महाराजांच्या परम् भक्त संत बायजाबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments