Festival Posters

CBI अलर्ट : स्मार्टफोन युझर्सला Cerberus व्हायरसचा धोका

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (14:34 IST)
सीबीआयने अलर्ट जाहीर करुन स्मार्टफोन यूजर्सला सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने इशारा जारी करत म्हटले की देशभरातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. 
 
करोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे. तसेच फिशींग (phishing) प्रकारच्या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते आहे. यासंदर्भातील इशारा सीबीआयने जारी केला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍लर्ट जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. 
 
करोनामुळे जगभरामध्ये दहशत पसरल्याचा फायदा घेतला जात असून करोनासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी ट्रेण्डचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशातून सर्बेरसचा वापर केला जात आहे. सर्बेरसच्या माध्यमातून करोना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचे मेसेज यूजर्सला पाठवले जातात. करोनासंदर्भातील महत्वाची माहिती असल्याचे भासवून अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. आणखी लिंकवर क्लिक करताच ट्रोजन स्मार्टफोनमध्ये इन्सॉटल होतो.
 
Cerberus हा ट्रोजन अंत्यत धोकादायक असून याने युजर्सची खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. बँकींगसंदर्भातील माहितीसाठी सर्बेरस खूप धोकादायक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 
 
युजर्सच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी माहीती जसे क्रेडीट/डेबिट कार्ड डिटेल्स आणि इतर महत्वाची माहिती ट्रोजन चोरी करतो. जे अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले गेले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments