Marathi Biodata Maker

CBI अलर्ट : स्मार्टफोन युझर्सला Cerberus व्हायरसचा धोका

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (14:34 IST)
सीबीआयने अलर्ट जाहीर करुन स्मार्टफोन यूजर्सला सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने इशारा जारी करत म्हटले की देशभरातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. 
 
करोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे. तसेच फिशींग (phishing) प्रकारच्या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते आहे. यासंदर्भातील इशारा सीबीआयने जारी केला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍लर्ट जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. 
 
करोनामुळे जगभरामध्ये दहशत पसरल्याचा फायदा घेतला जात असून करोनासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी ट्रेण्डचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशातून सर्बेरसचा वापर केला जात आहे. सर्बेरसच्या माध्यमातून करोना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचे मेसेज यूजर्सला पाठवले जातात. करोनासंदर्भातील महत्वाची माहिती असल्याचे भासवून अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. आणखी लिंकवर क्लिक करताच ट्रोजन स्मार्टफोनमध्ये इन्सॉटल होतो.
 
Cerberus हा ट्रोजन अंत्यत धोकादायक असून याने युजर्सची खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. बँकींगसंदर्भातील माहितीसाठी सर्बेरस खूप धोकादायक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 
 
युजर्सच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी माहीती जसे क्रेडीट/डेबिट कार्ड डिटेल्स आणि इतर महत्वाची माहिती ट्रोजन चोरी करतो. जे अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले गेले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments