Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन, युतीकडे राष्ट्रवादाचा मुद्दा – देवेद्र फडणवीस

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2019 (08:37 IST)
गेल्या 30 वर्षांपासून आमची युती आहे. ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है  असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेना आणि भाजपला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा धागा बांधून ठेवते तर आम्ही युती केली तेव्हा शिवसेना-भाजपा दोघे मिळून एकत्र कार्यकर्ता मेळावा घेणार आहोत हे ठरले होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र भाजप-शिवसेनेचा संयुक्त मनोमिलन मेळाव्यात आपले मत व्यक्त केले.
 
युती झाली आणि युतीच्या हुंकाराने विरोधक पुरते गांगरले आहेत. कार्यकर्त्याचा मेळावे झाल्यावर महायुतीची 24 तारखेला पहिली सभा होणार आहे. आमची युती 30 वर्षांपासून असून, ‘ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है’असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकायच्याच असा निर्धार कार्यकर्त्यांना समोर व्यक्त केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने व राज्यातील युती  सरकारने जनसामान्यांसाठी मोठी  कामे केली आहेत सोबतच अनेक योजना राबल्या असून यामध्ये हागणदारी मुक्त योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान योजनेचाही उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन
 
देशात 22 पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आणि सर्व बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र हात वर करून ‘हम साथ साथ है’च्या घोषणा देखील  केल्य. मात्र त्या जागेवरून बाहेर पडताच सपा-बसपाने काँग्रेसला म्हटले ‘हम आपके है कौन’आणि काँग्रेसने दिल्लीमध्ये आपला म्हटलं ‘हम आपके कौन है’.आता हे सार्व एकमेकांना कसे पराभूत करता येईल यासाठी काम सुरु केले आहे. या सर्व एकत्र आलेल्या विरोधकांचे महागठबंधन नाही तर महाठगबंधन असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. आमची युती नसून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी लढण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments