suvichar

वडिलांच्या मारेकर्‍यांना माफ केले: राहुल गांधी

Webdunia
'वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसला होता. आम्ही खपू तणावात होतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नसल्याने मी आणि प्रियांकाने वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 
 
सिंगापूर येथे आयआयएममध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा उपद्रवी लोक तुमच्या विरोधात जातात. त्यामुळे तुमचा मृत्यू अटळ असतो. वडील आणि आजीने घेतलेल्या भूमिकांमुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, याची आमच्या कुटुंबाला कल्पना होती, असं राहुल यांनी सांगितलं. 
 
वडील मृत्यूला सामोरे जात आहेत. हे आम्हाला माहित होतं. आमची आजी इंदिरा गांधीही मृत्यूला सामोरे जात आहेत, हे सुद्धा आम्हाला माहित होतं, असं सांगतानाच मी मरणाला सामोरे जात आहे, असं इंदिरा गांधी यांनी घरात सांगितलं होतं. वडिलांनीही तेच सांगितलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राहुल यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

नागपुरात कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाची केली 24 लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

गाढवे पाळा भरीव उत्पन्न मिळवा; सरकार ५० लाख रुपये देत आहे... अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments