Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडिलांच्या मारेकर्‍यांना माफ केले: राहुल गांधी

Webdunia
'वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसला होता. आम्ही खपू तणावात होतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नसल्याने मी आणि प्रियांकाने वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 
 
सिंगापूर येथे आयआयएममध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा उपद्रवी लोक तुमच्या विरोधात जातात. त्यामुळे तुमचा मृत्यू अटळ असतो. वडील आणि आजीने घेतलेल्या भूमिकांमुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, याची आमच्या कुटुंबाला कल्पना होती, असं राहुल यांनी सांगितलं. 
 
वडील मृत्यूला सामोरे जात आहेत. हे आम्हाला माहित होतं. आमची आजी इंदिरा गांधीही मृत्यूला सामोरे जात आहेत, हे सुद्धा आम्हाला माहित होतं, असं सांगतानाच मी मरणाला सामोरे जात आहे, असं इंदिरा गांधी यांनी घरात सांगितलं होतं. वडिलांनीही तेच सांगितलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राहुल यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments