Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चक्क व्हाट्सअपवर आरोपपत्र, सर्वोच्च न्यायालयाकडून फटकार

Webdunia
सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (08:44 IST)
झारखंडच्या एका स्थानिक न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव आणि त्यांच्या पत्नी निर्मलादेवी यांच्याविरोधातील गुन्हेगारी खटल्याचे कामकाज सुरु ठेवताना आरोपपत्र चक्क व्हाट्सअपवर टाकण्याचे अजब आदेश दिले. या प्रकरणात झारखंडचे माजी मंत्री साव आणि त्यांची पत्नी जामिनाच्या अटींचे सतत उल्लंघन करीत आहेत. दोघेही सतत भोपाळच्या बाहेरच राहतात. त्यामुळे या दोघांवरही खटल्याची सुनावणी करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दोघांवर व्हाट्सअॅपने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश हजारीबागच्या स्थानिक सत्र न्यायाधीशांनी दिले आहेत. यावर झारखंडमध्ये काय चालले आहे आणि जमिनीवरील आरोपी सुनावणीसाठी येत नाहीत ,याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. आरोपींची अटींचा भंग केला असेल तर त्यांचा जामीन रद्द करा, त्यासाठी व्हाटसअॅपवर आरोपपत्र कसले दाखल करता, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आणि भलतीच कृती करून न्यायसंस्थेची बदनामी करू नका, असा सज्जड दम स्थानिक सत्र न्यायालय आणि झारखंड सरकारला भरला.
 
माजी मंत्री साव आणि त्यांच्या पत्नीवर २०१६ मध्ये झारखंडच्या बारका गावातील गावकऱ्यांना राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून (एनटीपीसी) स्थलांतरित करण्याविरोधात आंदोलन छेडून दंगल भडकावल्याचे आरोप आहेत. २०१६ मध्ये झारखंडमध्ये पोलीस आणि गावकरी यांच्यात घडलेल्या हिंसक झटापटीत ४ जणांचा बळी गेला होता. याप्रकरणात  साव आणि त्यांच्या पत्नीला गेल्यावर्षी सशर्त जामीन देण्यात आला होता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments