rashifal-2026

चालण्याच्या पद्धतीतून होऊ शकेल व्यक्तीची ओळख

Webdunia
रविवार, 3 जून 2018 (13:43 IST)
शास्त्रज्ञांनी एक अनोखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यंत्रणा विकसित केली असून ती लोकांच्या चालण्याच्या पद्धतीआधारे त्यांची ओळख करू शकते. विमानतळांवरील सुरक्षातपासणीवेळी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान सध्याच्या सुरक्षा तपासणी पद्धतींच्या तुलनेच्या जास्त प्रभावी ठरू शकेल, असा दावा केला जात आहे. 
 
हे नवे तंत्रज्ञान थ्रीडी फूट स्टेप (पाऊल) आणि वेळेवर आधारित डाटाच्या विश्लेषणावर काम करते. स्पेनमधील माद्रिद युनिव्हर्सिटी व ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाआधारे शंभर टक्के अचूक पद्धतीने लोकांची ओळख केली. या संपूर्ण प्रणालीत चूक होण्याचे प्रमाण अवघे 0.7 टक्के असते. सुरक्षा तपासणीसाठी सध्या फिंगर प्रिंट, चेहर्‍याचे छायाचित्र, डोळ्यांचे दृष्टिपटलाच्या स्कॅनसारख्या पद्धतींचा सर्वात जास्त वापर केला जातो. या अध्ययनाचे प्रमुख ओमर कोस्टिला यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीचे चालतेवेळी सुमारे 24 वेगवेगळे फॅक्टर व हालचाली होतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीची चाल वैशिष्ट्यपूर्ण असते. याचआधारे त्याला सहजपणे इतरांपेक्षा वेगळे केले जाऊ शकते. या हालचालींवर नजर ठेवली तर संबंधित व्यक्तीची ओळख केली जाऊ शकते. हाताचेठसे घेण्याच्या पद्धतीच्या तुलनेत हे तंत्रज्ञान जास्त चांगले परिणाम देते. हे तंत्रज्ञान गजबजलेल्या व गोंगाटाच्या स्थळांवरही पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त प्रभावीही आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

पुढील लेख
Show comments