Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:32 IST)
देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रत्येक 12 वर्षांत चार ठिकाणी या मेळ्याचे आयोजन होत असल्याने दर तीन वर्षांनी देशातील एका स्थानावर कुंभमेळा आयोजित होतो. यापैकी नाशिक आणि उज्जैनमध्ये एका वर्षांच्या अंतराने कुंभमेळा आयोजित केला जातो.
 
आता प्रश्न येतो की कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो तर यामागची पुराणकथा अशी आहे की, जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. हे युद्ध सलग 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. हे थेंब पडलेले ठिकाण म्हणजे प्रयाग, ‍हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर 12 वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. आणि ज्या ठिकाणी हे थेंब पडले तिथे प्रत्येक 12 वर्षात कुंभमेळा भरतो.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments