Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंधन पुरवठा ठप्प टँकरचालकांच्या संपाचा फटका, भाजीपालाही महागला

Webdunia
बुधवार, 3 जानेवारी 2024 (09:41 IST)
केंद्र सरकारविरोधात ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. यामुळे राज्यातील इंधन पुरवठ्याला ब्रेक लागला आहे. याचे परिणाम मुंबईतही दिसू लागले असून, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 210 पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार, अशी माहिती पेट्रोलपंप मालक असोसिएशनने दिली आहे.
 
केंद्र सरकारने नव्याने केलेला रस्ते अपघात सुरक्षा कायदा जाचक व अन्यायकारक असल्याचे सांगत त्याच्या निषेधार्थ मनमाडनजीक पानेवाडी, नागापूर परिसरात असलेल्या तेल कंपन्यांच्या चालकांनी संपाचे अस्त्र उपसल्याने सोमवारी तीनही कंपन्यांतून एकही टँकर इंधन भरून बाहेर पडू शकला नाही. या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांत होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला असून, इंधनटंचाईचे संकट ओढवले आहे.
 
केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता थेट दहा वर्षे तुरुंगवास व ७ लाख रुपये दंड अशी तरतूद असल्याचे टँकर चालकांचे म्हणणे आहे. याला टँकरचालकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हा कायदा मागे घेण्यासाठी टँकरचालकांनी सोमवारी सकाळी संपाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला टँकरमालकांनीही पाठिंबा दिला. यामुळे पानेवाडी, नागापूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांतून इंधन पुरवठा बंद करण्यात आला.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

बनियान घालून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत पोहोचला, संतप्त न्यायाधीश म्हणाल्या - त्याला बाहेर काढा

नागपूर : मुलाने फ्रॉड करून विकले घर आणि फ्लॅट, वृद्ध दांपत्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली

चित्रपटात दिव्यांगांचा अपमान सहन करणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

रक्षाबंधनाला बहिणींना भेटवस्तू, सर्व अर्थसंकल्पीय योजना कायम- उद्धव यांच्या टोमणेला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

दीक्षाभूमि वाद : शमवण्यात येईल बेसमेंट पार्किंग स्थळ, NMRDA आणि स्मारक समिति बैठक मध्ये निर्णय

सर्व पहा

नवीन

...तर Pok चे भारतात विलीनीकरण शक्य झाले असते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मोठे वक्तव्य

आर्वीमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या 3 जणांना अटक, वनविभाग ने मांस विक्री करतांना पकडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा भारत आणि पाश्चात्य देशांसाठी का आहे महत्त्वाचा?

शाळेमध्ये 10वी क्लासच्या विद्यार्थ्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू

Pune अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले

पुढील लेख
Show comments