Dharma Sangrah

धक्‍कादायक : सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्ज घोटाळे

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:41 IST)
गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये भारतातील सार्वजनिक बँकांमध्ये 8670 कर्ज घोटाळ्यांची प्रकरणे नोंद झाली असून त्याची रक्‍कम तब्बल 61 हजार कोटी रुपयांची आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत हे घोटाळे झाले आहेत. यातही पीएनबी 389 प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 
 
गेल्या एकाच वर्षी 14,900 कोटी रुपयांची थकीत कर्जे वाढली आहेत. विशेष म्हणजे थकीत किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. 2012 - 13 मध्ये 6,357 कोटी रुपयांच्या थकीत कर्जांचे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटी रुपये इतके फुगले आहे. ‘रॉयटर्स’ने 21 सरकारी बँकांपैकी 20 बँकांकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती, त्यातल्या 15 बँकांनी ही माहिती दिली आहे.
 
विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँक 389 प्रकरणांसह आघाडीवर असून गेल्या पाच वर्षांत एकूण घोटाळ्यातील कर्जाचा आकडा 6,562 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर  बँक ऑफ बडोदा दुसर्‍या स्थानावर असून या बँकेला 4,473 कोटी रुपयांना गंडवण्यात आले आहे. तर 231 घोटाळे करून बँक ऑफ इंडियाला 4,050 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. तर स्टेट बँकेमध्ये पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची एकूण संख्या 1,069 आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जळगाव प्रेमप्रकरण रक्तरंजित! १२ वर्षांच्या संसाराला गोळीचा शेवट

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

भांडुपमध्ये ८वीच्या मुलांनी मित्राला संपवलं! तलावात फेकला मृतदेह

उन्नावमध्ये एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या ट्रकला रोडवेज बसची धडक, तीन प्रवाशांचा मृत्यू, ३१ जण जखमी

दिल्लीत बॉम्बची धमकी: तीन बँका आणि सहा शाळा उडवण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

पुढील लेख
Show comments