Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा अनुदानातून लाल शब्द काढून टाका, सरसकट अनुदान द्या

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (21:21 IST)
कांदा अनुदानातून लाल कांदा हा शब्द काढून सरसकट कांदा अनुदान मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे पालकमंत्री दादा भुसे  यांच्याकडे करण्यात आली आहे.
 
भुसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी आणि काही राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान  जाहीर केले आहे. हे अनुदान देण्यासाठी दि.27 मार्च रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकात कांदा अनुदानासाठी ज्या काही अटी शर्ती घालून दिलेले आहेत. त्यामध्ये फक्त लेट खरीप लाल कांदा असा उल्लेख आहे. परंतु कांद्याला कमी दर मिळाला म्हणून अनुदान द्यावे, अशी मागणी असून खरीप लाल कांदा किंवा रब्बी उन्हाळ कांदा असा भेदभाव न करता कवडीमोल दराने विकल्या गेलेल्या खरीप लाल आणि रब्बी उन्हाळी कांद्याला सरसकट अनुदान द्यावे.
 
तसेच अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नसल्याने सातबारा उताऱ्यावर कांदा पिक नोंद असल्याची अट देखील रद्द करावी,अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र पालकमंत्री यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांनी मालेगाव भेटीत दिले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments