Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महागाईचा चटका, तूरडाळ 100 रुपये किलो

Webdunia
लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. धान्य, कडधान्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली असून तूरडाळीचा भाव प्रतिकिलो 100 रुपये झाल्याने ग्राहकांना महागाईचे चटके बसताय. 
 
मागील दोन महिन्यांत डाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मसूर, मूग आणि मटकी या कडधान्याबरोबर, शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रात दुष्काळ तर काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने धान्य आणि कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून 100 रुपये दर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीचा दर 64 रुपयांवरुन 100 रुपयांवर पोहोचला आहे. 
 
मसूरडाळ आणि मूगाच्या दरात चार रुपये प्रतिकिलो चार या दराने वाढ झाली आहे. तसेच शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
 
उल्लेखनीय आहे की 2015 मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होते आणि त्यावर्षी 220 रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळीची विक्री झाली. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments