rashifal-2026

IND vs ENG : भारताने दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (15:03 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारतीय संघाने 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. अश्विन 500 कसोटी बळींपासून अजून एक विकेट दूर आहे.

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली. तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. 
 
भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

RCB ला मोठी रोख रक्कम मिळाली, दिल्ली कॅपिटल्सना 3 कोटी मिळाले

आरसीबीने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकले

IND vs ENG : U19 विश्वचषक अंतिम सामना

स्मृती मंधानाने WPL फायनलमध्ये अर्धशतकासह एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला

बंगळुरूने दिल्लीचा ६ विकेट्सने पराभव करून दुसरे WPL जेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments