Festival Posters

तात्या टोपे यांच्याबद्दल तुम्हाला या 7 खास गोष्टी माहित असाव्या

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (11:58 IST)
तात्या टोपे यांचा जन्म 1814 मध्ये येवला येथे झाला. तात्यांचे खरे नाव रामचंद्र पांडुरंग राव होते, पण लोक त्यांना प्रेमाने तात्या म्हणत. वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. त्यांचा जन्म देशस्थ कुलकर्णी कुटुंबात झाला.
 
त्यांचे वडील बाजीराव हे पेशव्यांच्या बंदोबस्त विभागाचे प्रमुख होते. त्यांची विद्वत्ता आणि कर्तव्यनिष्ठा पाहून बाजीरावांनी त्यांचा राज्यसभेत अनमोल नवरत्नांनी जडवलेली टोपी देऊन गौरव केला होता, तेव्हापासून त्यांचे टोपणनाव 'टोपे' असे पडले.
 
1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नायकांमध्ये तात्या टोपे यांचे उच्च स्थान आहे. त्यांचे जीवन अतुलनीय शौर्याने भरलेले आहे. तात्यांच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया-
 
* पेशवाई संपल्यानंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तिथे तात्यांनी पेशव्यांच्या राज्यसभेची जबाबदारी सांभाळली.
 
* 1857 च्या उठावाची वेळ जसजशी जवळ आली तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे मुख्य सल्लागार बनले.
 
* 1857 च्या उठावात तात्या एकट्याने इंग्रजांशी यशस्वीपणे लढले.
 
* 3 जून 1858 रोजी रावसाहेब पेशवे यांनी तात्यांना सेनापती पदावर नियुक्त केले. खचाखच भरलेल्या राज्यसभेत त्यांना रत्नजडित तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 
* 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर तात्याने गनिमीकाव्याची रणनीती स्वीकारली. गुना जिल्ह्यातील चंदेरी, इसागड तसेच शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी, कोलारस या जंगलात तात्या टोपे यांनी गनिमी कावा केल्याच्या अनेक दंतकथा आहेत.
 
* 7 एप्रिल 1859 रोजी तात्या शिवपुरी-गुणाच्या जंगलात झोपलेले असताना फसवणूक करून पकडले गेले. पुढे 15 एप्रिल 1859 रोजी तात्याला इंग्रजांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली.
 
* 18 एप्रिल 1859 रोजी सायंकाळी क्रांतिवीरांचे अमर हुतात्मा तात्या टोपे यांना ग्वाल्हेरजवळील शिपरी दुर्गाजवळ फाशी देण्यात आली. या दिवशी गळ्यात फास टाकून त्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

सावकाराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

LIVE: आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र

मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी न्यायालयात हजर, भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणी वाढल्या; POCSO न्यायालयाने FIR नोंदविण्याचा आदेश दिले

IND vs AUS: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना १७ धावांनी जिंकला

पुढील लेख
Show comments