Dharma Sangrah

World Earth Day 2022: जाणून घ्या 'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो, त्याचा इतिहास काय आहे आणि यंदा थीम काय

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:53 IST)
World Earth Day 2022: दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. हा दिवस असा एक प्रसंग आहे जेव्हा कोट्यवधी लोक पृथ्वीशी संबंधित पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येतात जसे की हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण आणि जैवविविधता संवर्धनासाठी अधिक जागरूक व्हावे आणि प्रयत्नांना गती मिळावी. हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिवस म्हणूनही ओळखला जातो. हे साजरे करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना पृथ्वीचे महत्त्व समजावे आणि पर्यावरण अधिक चांगले राखण्यासाठी जागरूक व्हावे. यामुळेच या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
 
झाडे लावणे, रस्त्यालगतचा कचरा उचलणे, लोकांना शाश्वत जीवन जगण्याचे मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. याशिवाय शाळा आणि विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
या दिवसाचे महत्त्व
1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. जैवविविधतेचे नुकसान, वाढते प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अर्थ डे ऑर्गनायझेशन (पूर्वीचे अर्थ डे नेटवर्क) तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात 193 देशांतील 1 अब्जाहून अधिक लोकांचा समावेश आहे.
 
2022 वर्षाची थीम काय आहे
यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम 'इन्वेस्ट इन आवर अर्थ' अशी आहे. म्हणजे 'आपल्या पृथ्वीवर गुंतवणूक करा'. यातील कळीचा मुद्दा म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे. याआधी 2021 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती 'आमची पृथ्वी पुनर्संचयित करा' आणि 2020 ची थीम 'क्लायमेट अॅक्शन' होती.
 
इतिहास
जागतिक वसुंधरा दिवस जागतिक स्तरावर 192 देशांद्वारे साजरा केला जातो. 60-70 च्या दशकात जंगले आणि झाडांची अंदाधुंद कत्तल पाहता, सप्टेंबर 1969 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन येथे एका परिषदेत, विस्कॉन्सिनचे अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी तो साजरा करण्याची घोषणा केली. या देशव्यापी जनआंदोलनात अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेतला. आणि या परिषदेत 20 हजारांहून अधिक लोक जमले होते. हा दिवस 1970 पासून सातत्याने साजरा केला जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या अस्थिकलशाचे बाणगंगेत विधिवत विसर्जन केले

धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेऊ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

पुढील लेख
Show comments