सौ:- अहो तुमच्यापुरताच केलाय, मला नकोय... अन् बच्चू गोड पदार्थाला तोंड लावत नाही, माहितीये ना?
नवरा:- अच्छा, पण शिरा मात्र मस्त जमलाय हं...! असा आधी कधी खाल्लाच नाही...
काजू, बदाम, चारोळी, वरून सढळ हाताने साजूक तूप... आता इथून पुढे असाच करत जा!
सौ:- अहं,,, आता परत असा नाही जमणार?
नवरा:- का गं?
सौ:- अहो दिवाळीचे चार-पाच रव्याचे लाडू उरलेले होते, तुम्हा दोघांना किती आग्रह केला तरी कुणी खाईना.... मग ते बारीक केले, त्यात पाणी टाकून गॅसवर शिजवले, गरमागरम शिरा तैय्यार... परत असाच शिरा करायला शिळे लाडू कुठून आणू? गिळा आता पटापट....!