Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर म्हणे अस्स होतं...

marathi kavita
Webdunia
सोमवार, 5 जुलै 2021 (20:11 IST)
लग्नानंतर म्हणे अस्स होतं,
लग्नानंतर म्हणे तस्स होतं,
प्रत्येक जण काहीं न काही म्हणतो,
पण जो भोगतो तोच खरं जाणतो !
राखली जातात का खरंच मन एकमेकांची,
जपणूक होते का हो एक दुसऱ्याच्या भावनांची!
सतत सोबत राहिल्याने चेहेरे दिसू लागतात सारखे!
पण सोबत असले तरी, नसतात का परके!
लोकांना दिसावं म्हणून हसतात कित्ती तरी खोटं,
तुटू नये म्हणून तोलून धरतात खोपट,
असतात असें ही आपल्या अवती भवती,
ओळखायचं कसं, मुखवटे चढवतात न चेहेऱ्यावरती!
घुसमटतात, व्याकुळ होतात पण राहतात सोबत,
खऱ्या लग्नाची मात्र मोजावी लागते किंमत!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल

जातक कथा : दयाळू मासा

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात नक्की ट्राय करा थंडगार केशर लस्सी रेसिपी

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

नखांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या

उष्माघात झाल्यावर हे फळ खाल्ल्याने त्वरित आराम मिळेल

चहाचे गाळणे काळे आणि चिकट झाले का? या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments