suvichar

लग्नानंतर म्हणे अस्स होतं...

Webdunia
सोमवार, 5 जुलै 2021 (20:11 IST)
लग्नानंतर म्हणे अस्स होतं,
लग्नानंतर म्हणे तस्स होतं,
प्रत्येक जण काहीं न काही म्हणतो,
पण जो भोगतो तोच खरं जाणतो !
राखली जातात का खरंच मन एकमेकांची,
जपणूक होते का हो एक दुसऱ्याच्या भावनांची!
सतत सोबत राहिल्याने चेहेरे दिसू लागतात सारखे!
पण सोबत असले तरी, नसतात का परके!
लोकांना दिसावं म्हणून हसतात कित्ती तरी खोटं,
तुटू नये म्हणून तोलून धरतात खोपट,
असतात असें ही आपल्या अवती भवती,
ओळखायचं कसं, मुखवटे चढवतात न चेहेऱ्यावरती!
घुसमटतात, व्याकुळ होतात पण राहतात सोबत,
खऱ्या लग्नाची मात्र मोजावी लागते किंमत!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

प्रेरणादायी कथा : गुराखी आणि बैलाची गोष्ट

या ट्रिक तुमच्या जेवणाची चव वाढवतील, नक्की अवलंबवा

३५ नंतर महिलांच्या शरीरात होणारे हे बदल दुर्लक्षित करू नका; तज्ञांनी दिला इशारा

वजन कमी होत नाही? रात्री झोपण्यापूर्वीच्या या 5 सवयी कारणीभूत असू शकतात

उरलेल्या पोळ्यांपासून असा भन्नाट नाश्ता बनवा की पाहुणेही रेसिपी विचारतील

पुढील लेख
Show comments