Marathi Biodata Maker

नवी मुंबई आयुक्तांकडून महत्त्वपूर्ण सूचना जारी

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (08:40 IST)
नवी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये नियम न पाळणाऱ्या कार्यालयांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यानुसार एखाद्या कार्यालयाने पहिल्यांदा नियम मोडला तर 50 लाखांचा दंड आकारला जावा, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते कार्यालय सील करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
 
नियमांची त्रिसूत्री न पाळणाऱ्यांना कोव्हिडचा धोका आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रतिबंधात्मक उपाय करत आहे. मार्केटमध्ये अथवा गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्क न वापरल्याने कोरोना होऊ शकतो. याशिवाय आपल्यामार्फत इतरांनाही त्याची बाधा होऊ शकते. त्यामुळे महापालिका उपाययोजना करून अंमलबजावणी करत आहे. यासाठी महापालिकेने 155 जणांचे कारवाई पथक तयार केलं आहे.
 
महापालिकेचं पथक 24 तास गस्त घालत आहेत. या पथाकामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नियमांचा भंग केल्यामुळे गेल्या 11 दिवसात 4377 व्यक्ती आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर 25 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
 
कारवाई करत असताना पारदर्शकता असावी. तसेच कोणी नियमावलीचा गैरफायदा घेऊ नये. त्यामुळे कुठल्या पद्धतीची उल्लंघन झाले आणि किती दंड भरावा लागणार याबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. आस्थापनानी (कार्यालयांनी) नियमांचा भंग केल्यास पहिल्यांदा पन्नास हजार दंड, नियमांचा भंग केल्यास आस्थापना सात दिवसांसाठी सील तर तिसऱ्यांदा भंग झाल्यास कोरोना असेपर्यंत आस्थापना सील करण्यात येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments