Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुर्ला बस अपघातानंतर महापालिकेची कारवाई, सर्व फेरीवाले हटवले

कुर्ला बस अपघातानंतर महापालिकेची कारवाई  सर्व फेरीवाले हटवले
Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2024 (15:49 IST)
मुंबईत कुर्ला बस अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला.या अपघातानंतर कुर्ला बेस्ट महापालिकेने कडक कारवाई करत स्थानका जवळील 150 मीटर पर्यंतच्या फेरीवाल्याना परिसरातून हटवण्यात आले आहे. या बाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही अनेकदा फेरीवाल्यांवर कारवाई करतो मात्र ते पुन्हा येऊन बसतात. लोक म्हणतात की हे फक्त काही दिवसांसाठी आहे. काही दिवसांनंतर फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. अपघातापूर्वी स्थानकाच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी अधिपत्य गाजवले आहे. बेस्टच्या बस ला देखील अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला आहे. 
 
शेअरिंग ऑटो स्टँड आणि इतर वाहनांची ये-जा यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑटो स्टँड आहेत, जवळच शाळा आहे, त्यामुळे लोकांना चालणे कठीण झाले आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र कोणीही तोडगा काढत नव्हता. मात्र बस अपघातात सात जणांना जीव गमवावा लागल्यानंतर महापालिकेने कारवाई करत फेरीवाले हटवले.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात चेन स्नॅचर चेन्नई पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये ठार

LIVE: वर्धा जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायत क्षेत्रात 'आपले सरकार' केंद्रे स्थापन होणार

तीन मुलांचे मृतदेह त्यांच्या घरात रहस्यमय मृतावस्थेत आढळले

‘मनसेला शेवटचा इशारा…’,मराठी न बोलल्याने हिंदी भाषिकांना मारहाण केल्याबद्दल चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी संतप्त

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगाचे औरंगजेब आहे... शिवसेना नेत्याने विधानावरून गदारोळ

पुढील लेख
Show comments