Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमधील एपीएमसीची पाचही मार्केट एका आठवड्यासाठी पूर्पणणे बंद

Webdunia
शुक्रवार, 8 मे 2020 (16:49 IST)
करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेता नवी मुंबईमधील एपीएमसीची मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट एका आठवड्यासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. 
 
सोमवारपासून म्हणजे 11 मे ते 17 मे पर्यंत पाचही मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान व्यापारी, कामगारांची तपासणी केली जाणार आहे.
 
गेल्या दोन आठवडय़ांत एपीएमसीत करोना रुग्ण वाढू लागले आहेत. नवी मुंबईत एपीएमसी बाजार आवारातील संसर्गाचे ७९ रुग्ण झाल्याने काळजी वाढत चालली आहे. हे मार्केट खूप मोठं असून येथून नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील रुग्ण वाढीबरोबर आता इतर जिल्ह्य़ातही संसर्ग पोहचत असल्याचे समोर आले आहे. 
 
एपीएमसीतील फळ बाजारात मंगळवारी वेंगुर्ले येथील आंब्याचा ट्रक घेऊन आलेल्या एका चालकाचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे हा धोका लक्षात ‘क्लोज एपीएमसी, सेव नवी मुंबई’  अशी मोहीम सुरु झाली होती. यानंतर प्रशासनाने मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख