Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

Webdunia
शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (18:13 IST)
‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे सर्व मंत्री तसेच देशातील भाजपाचे सर्व नेते असे एकूण १२ हजार लोक एकत्र आले होते. देशात बहुमताने पुन्हा एकदा आमचे सरकार येईल यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. २०१३-१४ च्या परिस्थितीला बदलून आज भाजपने भारतात एक वेगळी उंची गाठली आहे. देशाची अर्थव्यवस्था आज सक्षम झालेली आहे. आज देशात प्रत्येकाला वीज मिळत आहे. आज साडेनऊ करोड शौचालय बनले आहेतअसे  रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. ६ करोड गरिबांना मोफत कुकिंग गॅस दिले. आज देशात फक्त २ ते अडीच करोड लोकांना फक्त मोफत गॅस देण्याचे शिल्लक राहिले आहे. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून ५० करोड लोकांना फायदा होत आहे.’

गोयल यावेळी म्हणाले की, ‘देशातल्या प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळेल. या पाच वर्षात लोकांना भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळेल. एका कुटुंबाने फक्त ५० वर्ष भ्रष्टाचार केला पण पारदर्शीपणे लोकांना लाभ पोहोचेल असे काम आम्ही केले आहे असे सांगितले. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments