Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसचा जाहीरनामा हा देश तोडणारा

Webdunia
बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:36 IST)
काँग्रेसचा जाहीरनामा हा देश तोडणारा असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. काँग्रेसच्या घोषणा पत्रात देशद्रोहाचा गुन्हा हटवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. देश तोडणारे आश्वासन देणारी काँग्रेस एकाही मताची हकदार नाही. नियम आणि कायद्याची समीक्षा करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नक्षलवाद्यांना वाचवण्यासाठी सीआरपीएफमध्ये बदल करण्याची घोषणा केल्याचा आरोप जेटलींनी केला आहे.
 
जम्मू काश्मीरमध्ये सेना आणि सीआरपीएफ सैनिकांच्या संख्येत कपात करणे तसेच अफस्पाचे प्रावधान कमजोर करण्याचे म्हटल्याचे जेटली म्हणाले. काँग्रेसच्या घोषणापत्रात खतरनाक आश्वासने दिली आहेत. जे नियम पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी नाही हटवले त्यांना हटवण्याची भाषा राहुल गांधी करत असल्याचा टोला जेटलींनी लगावला आहे. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments