rashifal-2026

पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Webdunia
मंगळवार, 29 जून 2021 (12:53 IST)
पावासानं राज्यातील अनेक भागात दडी मारली होती पण आता पाऊस परतण्याची चिन्हे दिसत आहे. येत्या पाच दिवसांत राज्यासह देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही राज्यांमध्ये यलो अ‍ॅलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा समावेश आहे. याशिवाय, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा येथे पुढील 5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान, या राज्यांच्या वेगवेगळ्या भागात वादळी वारे व गडगडाटीसह वादळ देखील येऊ शकते. हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 30 जून आणि 1 जुलै रोजी जोरदार वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम-मेघालयात 28 जूनपासून म्हणजे आज ते 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये 30 जून आणि 1 जुलै रोजी पावसाची शक्यता आहे. 
 
जर आपण आजच्या हवामानाबद्दल बोललो तर उत्तर प्रदेशात हवामान चांगलेच तापले आहे. यूपीमध्ये सुस्त पावसाळ्यामुळे पाऊस पडत नाही. तथापि, पश्चिमेकडील काही जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्येही आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, उत्तराखंडमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात विखुरलेला पाऊस पडेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments