Dharma Sangrah

मुंबईत जोरदार पाऊस, दुपारी मोठी भरती येणार

Webdunia
शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:41 IST)
मुंबईच्या पश्चिम उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात सकाळी पाणी साचलेलं दिसतंय. आज आणि उद्या कोकण किनारपट्टीस मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. समुद्रालाही आज दुपारी मोठी भरती येणार असल्यानं नागरिकांना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.
 
मुंबईतील विविध भागात रात्रभर पाऊस सुरु आहे. वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय. अंधेरी आणि मालाड सबवे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आलीय. रात्रभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही सखल पाणी साचलंय. दहिसर पूर्व इथल्या काही इमारतीमध्ये पाणी भरलंय. तर लोकल रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम दिसून येतोय. जवळपास २०-२५ मिनिटे उशिरानं वाहतूक सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

पुढील लेख
Show comments