Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पावसाचा थैमान! पावसाळी दुर्घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू,पीएम मोदी यांनी 2 -2 लाख रुपये मदतीची घोषणा केली

Webdunia
रविवार, 18 जुलै 2021 (13:10 IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस रविवारी सकाळी देखील सुरूच आहे, त्यामुळे सर्वत्र विनाश होण्याचे दृश्य दिसत आहे. येथे भिंत कोसळण्याशी संबंधित दोन स्वतंत्र अपघातात झालेल्या दुर्घटनांमध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातांवर दु:ख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळीत भिंत कोसळल्यामुळे लोकांच्या झालेल्या मृत्यूमुळे मी दु: खी आहे. माझ्या संवेदना या दु: खाच्या घटनेत शोक झालेल्या कुटुंबियांसमवेत आहेत.जे लोक जखमी झाले आहेत ते लवकर ठीक व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. '
 
पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी,50-50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली. 
 
सध्या मुंबईच्या रस्त्यावर महापूर येण्याचे दृश्य आहे, तर मायानगरीची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची सेवा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील हनुमान नगर ते कांदिवली परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. सकाळी घरात शिरलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे. 
 
गांधी मार्केटच्या भागात भीषण जलसाठा झाला असून यामुळे वाहनांच्या हालचालीवर परिणाम झाला.त्याचबरोबर मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याने भरून गेला आहे. सायन परिसरातील मुख्य रस्त्यावर कंबरे पर्यंत पाणी भरले आहे.आजही मुंबईत पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments