Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय - आदित्य ठाकरे

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (16:26 IST)
केंद्र सरकार ने जम्मू काश्मीर येथून कलम 370 हटविल्यानंतर सर्व स्तरातून मोदी सरकारचं एकदम जोरफर कौतुक होते आहे. आपल्या देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक असून, 370 कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेनार आहे असा विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, एनडीएसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठीच आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पाठिंबा दिला होता. आदित्य यांनी सोशल मिडियावर ट्विट करत आपला आनंद आणि मोदी सरकारला पाठिंबा व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments