Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर प्रदेश: रोडवेज बसने पंजाबहून बिहारकडे जाणार्या मजुरांना चिरडले, 6 मरण पावले

Webdunia
गुरूवार, 14 मे 2020 (08:16 IST)
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये बुधवारी दुपारी एकच्या सुमारास एका भीषण अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. पंजाबहून परत आलेल्या कामगारांना मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्य महामार्गावर रोडवेज बसने चिरडले. या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला तर चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरा सर्व जखमींना मेरठ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मेरठमधील घौली चेकपोस्टसमोर रोहणा टोल प्लाझाजवळ हा भीषण अपघात झाला. बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील काही मजूर पंजाबहून पायी जात होते. पाठीमागून येणारी वेगवान रोडवेस बसने त्यांना चिरडले. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून मेरठ मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल कपरवन यांनी सहा मजुरांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की दोन मजुरांशी चर्चा झाली. त्यांनी रोडवेज बसला अपघात केल्याची माहिती आहे. सध्या रोडवेज बस हाती आली नाही. हे ट्रेस करण्यास नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. अपघातात जखमी झालेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा कळू शकला नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments