Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विशाखापट्टणमध्ये विषारी वायू गळती, 8 जणांचा मृत्यू

Vizag gas Leak
Webdunia
गुरूवार, 7 मे 2020 (13:17 IST)
आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दरम्यान पंतप्रधान मोदींनी घटेनेबद्दल ट्विट करत म्हटले की घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील विशाखापट्टणम येथील परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments