Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्राचा इतिहास नासवला - जितेंद्र आव्हाड

Webdunia
शनिवार, 4 जून 2022 (22:01 IST)
गेल्या काही दिवसांपासून दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखानावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीनं त्या वादावरुन अनेकदा बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका आणि आरोप केले आहेत. स्वत: शरद पवार यांनी देखील नाशिकमध्ये पत्रकार परिषदेतून या मुद्दयावर आपली बाजू मांडली होती. त्यातच आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहासा नासवला असं म्हटलं आहे. कनेक्ट महाराष्ट्र काँक्लेव्ह कार्यक्रमाच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले 'बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास नासवला. हे जेव्हा आम्ही महाराष्ट्रात बोलत होतो तेव्हा तो जेम्स लेन काही बोलला नाही. 20 वर्ष कुणी काही बोलत नाही, मात्र बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर तो जेम्स लेन सांगतो की, मला बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती दिली नव्हती. मला पुण्यातून ही माहिती भेटली होती. इमेलद्वारे त्यानं ही माहिती पाठवली. ही माहिती कोणी दिली? मात्र हीच माहिती पुरंदरेंनी आपल्या इतिहासात लिहीली आहे' असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला. आव्हाड पुढे म्हणाले की, 'पुरंदरेंनी लिहीलं मराठे आपलं राज्य, जमिनी वाचवण्यासाठी आपल्या आईलाही पाठवायला कमी जास्त करणार नाही.'

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments