Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Webdunia
शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (21:33 IST)
उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असणारा, देशासमोर आपली मते निर्भीडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांना प्रेरणा देणारा असा देशाभिमानी उद्योजक आपल्या मधून एकाएकी निघून जाण्याने राज्याच्या उद्योग विश्वाचे  नुकसान झळाळे आहे. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना मोकळ्या करून श्रद्धांजली वाहिली आहे. 

राहुल बजाज यांचे पार्थिव रविवारी सकाळी 10:30 वाजता आकुर्डीतील बजाज कंपनीत आणले जाणार आहे. कामगारांना दुपारी तीन वाजे पर्यंत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पुण्यात नेले जाणार असून सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. 
 
राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आली असून या क्षेत्रातील इतर कंपन्यासमोर भारताचे आव्हान उभारले.त्यांनी आपल्या उद्योगाचा विकास व्हावा असा संकुचित विचार केला नाही तर देशाच्या सर्व उद्योगाशी निगडित समस्या आणि त्यांच्यावर येणाऱ्या अडचणींवर स्पष्ट आणि निग्रही भूमिका घेतली. त्यांनी समाजासाठी देखील अनेक कार्य केले. 

राहुल बजाज हे उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या.  
  
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments