Festival Posters

बारावीत नापास झाल्याने इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 8 जून 2022 (18:55 IST)
आज बारावीचा निकाल जाहीर झाला. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात आणि परीक्षा देतात.त्याचा परिणाम जाहीर केला जातो. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आज जाहीर झालेल्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 
 
आज जाहीर झालेल्या निकालात काहींना भरभरून यश मिळाले आहे तर काही अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात गरवारे कॉलेजात वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी इमारतीच्या वरून उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवून आत्महत्या केली आहे. निखिल लक्ष्मण नाईक(19) असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दुपारी निकाल जाहीर झाल्यावर त्याने आपला निकाल ऑनलाईन पहिला आणि त्यात तो नापास झाल्याचे समजले. तो आतुरतेने निकालाची वाट बघत होता. आपण अपयशी झालो आहोत हे समजल्यावर त्याने थेट इमारतीच्या वरच्या मजल्यावर धाव घेत उडी घेतली आणि तो खाली उभा असलेल्या शेखर लहू कोणारे(30)याच्या अंगावर पडला या घटनेने बेसावध असलेले शेखर हे जखमी झाले त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला.
 
निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिल स्वभावाने शांत होता. क्रिकेटची आवड असेलल्या निखिल ने बॉडी बनवायला जिम सुरु केली होती. निखिल कडून त्याच्या आई -वडिलांच्या खूप अपेक्षा होत्या. त्याच्या आकस्मिक जाण्यामुळे श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments