rashifal-2026

बारावीत नापास झाल्याने इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 8 जून 2022 (18:55 IST)
आज बारावीचा निकाल जाहीर झाला. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात आणि परीक्षा देतात.त्याचा परिणाम जाहीर केला जातो. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आज जाहीर झालेल्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 
 
आज जाहीर झालेल्या निकालात काहींना भरभरून यश मिळाले आहे तर काही अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात गरवारे कॉलेजात वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी इमारतीच्या वरून उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवून आत्महत्या केली आहे. निखिल लक्ष्मण नाईक(19) असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दुपारी निकाल जाहीर झाल्यावर त्याने आपला निकाल ऑनलाईन पहिला आणि त्यात तो नापास झाल्याचे समजले. तो आतुरतेने निकालाची वाट बघत होता. आपण अपयशी झालो आहोत हे समजल्यावर त्याने थेट इमारतीच्या वरच्या मजल्यावर धाव घेत उडी घेतली आणि तो खाली उभा असलेल्या शेखर लहू कोणारे(30)याच्या अंगावर पडला या घटनेने बेसावध असलेले शेखर हे जखमी झाले त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला.
 
निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिल स्वभावाने शांत होता. क्रिकेटची आवड असेलल्या निखिल ने बॉडी बनवायला जिम सुरु केली होती. निखिल कडून त्याच्या आई -वडिलांच्या खूप अपेक्षा होत्या. त्याच्या आकस्मिक जाण्यामुळे श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Local body elections महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींकरिता ४७ टक्के मतदान झाले; मतमोजणी २१ डिसेंबर रोजी

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राजस्थानच्या १० दंत महाविद्यालयांना दंड, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

केंद्र सरकारने महाराष्ट्रात ८९,७८० कोटी किमतीचे ३८ रेल्वे प्रकल्प मंजूर केले

पुढील लेख
Show comments