Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीएम चन्नी यांच्या वक्तव्यावर नितीश कुमार संतापले, म्हणाले- काँग्रेसने कोणाला संधी दिली माहीत नाही

Webdunia
शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (16:02 IST)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीत पोहोचले. येथे त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. चन्नी यांच्या 'भैय्या' या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले की पक्षाने कोणत्या व्यक्तीला संधी दिली आहे हे काही कळत नाही. ते म्हणाले की या प्रकारे बोलून त्यांनी स्वतःचे नुकसान केले आहे.

झाले असे की एका रोड शोदरम्यान चन्नी म्हणाले होते की, बिहार-यूपीचा 'भैया' पंजाबमध्ये येऊन राज्य करू शकत नाही. प्रियांका गांधी या पंजाबच्या सून आहेत.
 
सीएम नितीश म्हणाले की चन्नी यांनी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. कारण बिहारचे किती तरी लोक पंजाबमध्ये राहतात आणि तेथील लोकांची सेवा करतात. काही परदेशात जाऊन देखील त्यांचे काम सांभाळतात. बिहार किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. गुरु गोविंद सिंग बिहारमध्येच जन्माला आले. प्रत्येक वेळी पंजाबचे लोक किती मोठ्या संख्येने बिहारमध्ये येतात. तेव्हा येथील लोक त्यांचे स्वागत करतात.
 
350 व्या प्रकाश उत्सवाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 2017 मध्ये किती मोठा कार्यक्रम झाला हे सर्वांनी बघितले आहे. त्यानंतरही हा कार्यक्रम अखंड सुरूच आहे. लोक किती आनंदी आहेत? आता चन्नी कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे तर मला माहीत नाही. पक्षाने कोणाला संधी दिली आहे, याची त्यांना कल्पना देखील नाही. असे बोलून त्याने आपलेच नुकसान केले आहे.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments