Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकरी कर्जमाफी झाली का - आदित्य ठाकरे

Webdunia
लातूर: एप्रिल-मे मध्ये येणारा दुष्काळ यंदा ऑक्टोबरमध्येच आला. दुष्काळग्रस्तांचा आवाज कुणी ऐकत नाही. सेनेनं मदत केली आहे आणि करीत राहणार असं वचन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. ते पेठ येथे बोलत होते. यावेळी त्यांनी एका शेतकर्‍याया घरी जाऊन भेट घेतली, विचारपूस केली. जनावरांना चारा दिला. या प्रसंगी बोलताना त्यांनी कर्जमाफीचे वाभाडे काढले. 

ऐतिहासिक कर्जमाफी असे फलक लावतात, झालीय का कर्जमाफी असा प्रश्न त्यांनी विचारताच नाही असे उत्तर जमलेल्या लोकांनी दिले. यावेळी खा. रवींद्र गायकवाड, शिवसेना जिल्हाध्यक्ष नामदेव चाळक, सुनिता चाळक, संतोष सोमवंशी, शोभा बेंजरगी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुढे आदित्य ठाकरे चलबुर्गा आणि किल्लारीकडे रवाना झाले.औसा तालुक्यातील मौजे चलबुर्गा, बुधोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. मला विद्यार्थ्यांनी दुष्काळाचे चित्र भेट दिले सबंध महाराष्ट्रात अशी दुष्काळी परिस्थिती आहे पाऊस नाही पण केवळ अश्रूंचा पाऊस पडत आहे. या भागात अरबी ची पेरणी झाली नाही असे सांगण्यात आले. मी तर शहरी बाबू आहे पण शिवसैनिक म्हणून मी तुमच्या संकटात तुमच्या सोबत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘स्वतःचे बरे वाईट करून घेण्याचा विचार मनात आणू नका असा विचार मनात आला तर शिवसेनेच्या आठवण काढा शिवसेना तुमच्या मदतीसाठी उभी राहील. आज पर्यंत मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळ येत होता आता मात्र ऑक्टोबरपासूनच दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आहे. दुष्काळ कितीही गंभीर असू द्या शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील’ असा विश्‍वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकांना दिला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments