Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार यांचा राज्यपालांना नाव न घेता मारला टोला

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:09 IST)
‘द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखले जाते. मात्र आज अनेक राज्यपालांच्या भुमिकेबद्दल वाद संशय आणि वाद निर्माण होताना आपण पाहतो’, अशा शब्दांत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
 
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या सुरूवातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाठींबा दिला.
 
“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १८ मे २०१५ रोजी झारखंडच्या पहिल्या महिला आणि आदिवासी राज्यपाल म्हणून शपथ घेतली. द्रौपदी मुर्मू या 6 वर्षे 1 महिना 18 दिवसांपासाठी राज्यपाल पदी कार्यरत होत्या. त्या झारंखंडच्या अशा पहिल्या राज्यपाल होत्या की, ज्यांना त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पदावरून हटवण्यात आले नव्हते. द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखले जाते. मात्र आज अनेक राज्यपालांच्या भुमिकेबद्दल वाद संशय आणि वाद निर्माण होताना आपण पाहतो. मात्र द्रौपदी मुर्मू या राज्याच्या राज्यापाल म्हणून राजकीय वादातून दुर राहिलेले आपण पाहिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले जात होते”, असे अजित पवार यांनी म्हटले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments