Marathi Biodata Maker

आंबा घाट आजपासून वाहतुकीला सुरु

Webdunia
गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (16:04 IST)
कोकणात 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद असलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील  आंबा घाट आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. गेले दहा दिवस हा घाट बंद होता. दरडी बाजूला हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हलक्या आणि लहान वाहनांसाठी हा मार्ग आजपासून सुरु करण्यात आला आहे.
 
रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला आंबा घाट अतीवृष्टीमुळे रस्ता खचल्यामुळे आणि दरडी  कोसळल्यामुळे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. 11 दिवस बंद असलेल्या हा घाट रस्ता आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. आंबा घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनचा वापर करून रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले आणि आता तो वाहतुकीला सुरु झालाय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दुबई विमानतळाजवळ दोन ड्रोन पाडण्यात आले, एका भारतीयासह चार जण जखमी

गेल्या एका वर्षात आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या पाच भारतीय संघांचा सन्मान होणार

भारतात पहिल्यांदाच इच्छामरणाची परवानगी

LIVE: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये उघडतील

काय तिसरे महायुद्ध सुरू झाले ? World War कसे सुरू होते ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments