Marathi Biodata Maker

बदलांवर बोलणे औचित्यभंग कसे?

Webdunia
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (12:21 IST)
मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) कार्यक्रमात चालू भाषणावर आक्षेप घेत बोलू न दिल्याबद्दल अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
 
मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) कार्यक्रमात चालू भाषणात तुम्ही हे बोलू नका असे सांगून अनेक अडथळे आणले गेले, औचित्यभंगाचे कारण पुढे करुन मला भाषण करु दिले नाही. एखाद्या वक्तव्याने काय बोलावे काय नाही, याची माहिती त्याला आधी द्यायची असते, मात्र मला तसे सांगण्यात आले नव्हते. मात्र, एनजीएमएमधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांवर बोलणे हे औचित्यभंग कसे असू शकते? असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संध्या गोखले या देखील उपस्थित होत्या.
 
एनजीएमए येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले होते. त्यामुळे कलाविश्वासोबतच विविध क्षेत्रातून कार्यक्रमाच्या आयोजकांवर टीका होऊ लागली आहे. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रुखम पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपले स्वातंत्र्य कसे गमावले, याबद्दल पालेकर बोलत होते.  
 
पालेकर म्हणाले, एनजीएमए नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रभाकर बर्वे या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराच्या कलेला उजाळा देण्याचे काम सुरु होते. तिथे मला वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी हा कार्यक्रम बर्वेंसंदर्भात असल्याने त्यावरच बोलावे सरकारवर टीका करु नये, असे मला कार्यक्रमाच्या प्रुखांकडून सांगत औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन माझ्या भाषणात अनेकदा अडथळे आणले गेले. ही संस्था आणि त्यामध्ये आता झालेले बदल यावर मी बोलण हे औचित्यभंग कसे आहे हे मला कळत नाही. त्यामुळे या मंचावरुन हे बोलू नये, असे सांगणे हे चुकीचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली

महाराष्ट्रातील पहिली सीबीएसई जिल्हा परिषद शाळा पुण्यात सुरू होणार, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन करणार

"आयटी कंपन्यांमधील धर्मांतर रॅकेट खपवून घेतले जाणार नाही," नाशिक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक

माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments