Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदित्य ठाकरे वगळता उद्धव गटातील व्हीपची अवहेलना करणाऱ्या 14 आमदारां विरोधात कारवाई होणार ?

Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (23:48 IST)
महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत सुरू आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सभापतींना पत्र लिहून उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. व्हीपची अवहेलना करणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिल्याचे गोगावले यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर म्हणून त्यांचे (आदित्य ठाकरे यांचे) नाव घेतलेले नाही.
 
रविवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटातील सुनील प्रभू यांच्या जागी शिंदे गटातील भरत गोगावले यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोद  म्हणून  नियुक्ती केली होती. यानंतर गोगावले यांनी सर्व आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊन आपल्या बाजूने उभे राहण्याचा व्हीप जारी केला.पण ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील 15 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे व्हिप मोडणाऱ्या आमदारांविरोधात शिंदे गटाते प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.या आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी भरत गोगावले यांनी पत्रात केली आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्रात 14 आमदारांची नावं आहेत. त्यातून आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. 
 
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणाची सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments