Dharma Sangrah

भंडारा भीषण अपघातात 8 ठार 13 जखमी

Webdunia
मंगळवार, 1 मे 2018 (08:56 IST)
जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागपूरच्या वऱ्हाड्यांना कंटेनरने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री 8च्या सुमारास घडली. या अपघातात सुमारे 8 ठार तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. संतप्त नागरिकांनी रास्तारोको करत संताप व्यक्त केला आहे. यामुळे ताण निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वरील लाखनी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन आहे. सोमवारी सायंकाळी येथील विवाह सोहळ्यासाठी नागपूरचे हरगुडे कुटुंबातील वऱ्हाडी आले होते. लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी महामार्गाच्या कडेला उभे होते. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नवरदेवाच्या गाडीला धडक देत वऱ्हाड्यांना चिरडले. मृतकांमध्ये हिंगणघाट येथील एक दाम्पत्य आणि दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती ढासळल्याने नंतर त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Maharashtra ban on plastic flowers सजावटीसाठी खऱ्या फुलांचा वापर करा अन्यथा कारवाई होईल; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

LIVE: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या कॉपीबाबत फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली

महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहनांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; मंत्री सरनाईक यांचे आरटीओला निर्देश

पालघर जिल्ह्यात व्हॉट्सअॅप डीपीवरून झालेल्या वादात तरुणाची चाकूने वार करून हत्या

गुजरातमध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच पोस्ट ऑफिसना मिळाले धमकीचे ईमेल

पुढील लेख
Show comments