Dharma Sangrah

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले

Webdunia
मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर भागात धोकादायक इमारत कोसळली आहे. ही चार मजली इमारतीला तडे गेल्यानंतर रहिवाशांची सुटका करतानाच इमारत पडली साहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ढिगाराखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.  
 
शांतीनगर भागातील चार मजली इमारतीचा कॉलम शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हलू लागला होता, त्यामुळे यातील रहिवासी घाबरले होते, साडेनऊच्या सुमारास महापालिका कंट्रोल रुमला फोन गेल्यानंतर रहिवाशांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु झाले.  मात्र दुर्दैवाने त्याचवेळी सुमारास संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.  यामध्ये विशेष असे की इमारत केवळ सहा वर्ष जुनी आहे, अर्थात बांधकामाच्या दृष्टीने नवीन इमारत आहे.  या दुर्घटनेत 28 वर्षीय शिराज अन्सारी आणि आकिब या दोघांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील काहीना जिवंत बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

कस्तुरबा मोहनदास गांधी यांची माहिती

एसटी बस प्रवास आता 'स्मार्ट'; १ एप्रिलपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य

"झाडे तोडणे हे सैनिकांच्या बलिदानासारखे आहे," या पंकजा मुंडे यांच्या विधानावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली

LIVE: आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र

सावकाराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

पुढील लेख
Show comments