Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट – मुख्यमंत्री

Webdunia
शनिवार, 28 जुलै 2018 (16:11 IST)
पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचणार्‍यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश असून, त्यांचे संभाषण आमच्या हाती लागले असून, या नेत्यांवर सरकारने कारवाई सुरू केली आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सापाचा विषय अजून चिघळला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला होता. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले. 
 
पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच सापसोडे म्हटले नसून गुप्तचर विभागाकडून जी माहिती आली, त्याआधारे त्यांनी हे विधान त्यांनी केले आहे. या मध्ये वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यात घबराट निर्माण होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा न करण्याचा निर्णय घेतला होता.
 
मराठा समाजाला आरक्षण देणे हा आमचा राजकीय अजेंडा नसून ती आमची निष्ठा आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. आम्ही हे आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध आहोत. आमचे सरकार आल्यानंतर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला, असे सांगतानाच राज्य सरकार कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख