Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून,कोरड्या हवामानाची स्थिती

Webdunia
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (08:56 IST)
दिवाळीच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. मात्र, त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून, राज्यात या काळात बहुतांश भागात कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात देशातील हे पहिले चक्रीवादळ असून, त्याचा फटका पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील पावसाळी स्थिती सध्या निवळत असून, मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला वेग मिळत आहे.
 
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस होतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागामध्ये पावसाळी स्थिती दूर होऊन कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. पुढील एक-दोन दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत काही भागांतच पावसाची शक्यता आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments