Festival Posters

पडद्यामागे 'अर्थ'पूर्ण बाबी घडल्या का? - धनंजय मुंडे

Webdunia
सोमवार, 13 ऑगस्ट 2018 (09:26 IST)
मल्टिप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांबाबत सरकारचा 'यू टर्न' गूढ आणि चमत्कारिक;

राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला यू टर्नचा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून या प्रकरणी पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी उपस्थित केला आहे.
 
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू तसेच १ ऑगस्टपासून खाद्यपदार्थांच्या किमतीची एकच एम.आर.पी. राहिल अशी भूमिका घेतली होती.
 
मात्र या भूमिकेवरून अचानक यू टर्न घेत सरकारने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती. सरकारच्या या भूमिकेवर धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे संशय व्यक्त केला असून सरकारने न्यायालयात घेतलेली यू टर्नची भूमिका गूढ आणि चमत्कारिक आहे. या पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या असाव्यात असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणार्‍या ठिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टिप्लेक्समध्ये अशी बंदी घालून सरकार मल्टिप्लेक्स चालकांना राज्यातील लाखो प्रेक्षकांची लूट करण्याचा उघड परवाना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर

23 मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहीद दिवस

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

पुढील लेख
Show comments