Festival Posters

पडद्यामागे 'अर्थ'पूर्ण बाबी घडल्या का? - धनंजय मुंडे

Webdunia
सोमवार, 13 ऑगस्ट 2018 (09:26 IST)
मल्टिप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांबाबत सरकारचा 'यू टर्न' गूढ आणि चमत्कारिक;

राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला यू टर्नचा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून या प्रकरणी पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी उपस्थित केला आहे.
 
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू तसेच १ ऑगस्टपासून खाद्यपदार्थांच्या किमतीची एकच एम.आर.पी. राहिल अशी भूमिका घेतली होती.
 
मात्र या भूमिकेवरून अचानक यू टर्न घेत सरकारने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती. सरकारच्या या भूमिकेवर धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे संशय व्यक्त केला असून सरकारने न्यायालयात घेतलेली यू टर्नची भूमिका गूढ आणि चमत्कारिक आहे. या पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या असाव्यात असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणार्‍या ठिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टिप्लेक्समध्ये अशी बंदी घालून सरकार मल्टिप्लेक्स चालकांना राज्यातील लाखो प्रेक्षकांची लूट करण्याचा उघड परवाना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments