Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (22:52 IST)
आज महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता इयत्ता 10 वी चा निकाल कधी लागणार या बद्दल विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. त्यांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिले आहे. त्यांनी इयत्ता 10 वी  च्या निकालाची तारीख जाहीर केली असून येत्या 27 मे रोजी निकाल जाहीर केला जाऊ शकतो.  
 
मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले बारावीच्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. ज्या मुलांना कमी मार्क पडले आहेत ते पुन्हा परीक्षेसाठी बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना केली आहे. 
ते म्हणाले कोणीही नाराज होऊ नयेत संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा येत्या 27 मे रोजी 10 वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. आरटीई घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले याला घोटाळा म्हणता येणार नाही, कोणीही कागदपत्रे खोटी तयार करू नये. जिल्हास्तरावर ऍडमिशनची प्रक्रिया होते. या बाबत जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

डंपरची दुचाकी आणि पिकअपला धडक, ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी

मनू भाकरला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष तयार केला

LIVE: बुलढाण्याच्या पेनटाकळी येथील ग्रामस्थांचे उपोषण संपले

कॅनडामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना बर्फाळ जमिनीवर विमान उलटल्याने १९ प्रवासी जखमी

पुढील लेख
Show comments