rashifal-2026

धक्कादायक शेतकऱ्याकडून एक लाख लाचेची मागणी

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:50 IST)

उस्मानाबाद येथील एका शेतकऱ्याकडून महावितरणच्या एका अभियंत्याने एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली आहे. त्याला लाच घेताना अटक केली आहे. यामध्ये शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करण्यासाठी आणि नवीन   बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली. तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात  बोअर वेल विजेचा डीपी नादुरुस्त असल्याने मागील  ६ महिन्यापासून बंद होता. हाच  डीपी दूरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये त्यांना  पहिला १ लाख रुपये लाचेची हप्ता मुरूम मोड येथे घेताना महावितरणचा सहायक अभियंता सुधीर बुरनापल्ले , वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग सिद्धराम जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महावितरण मोफत वीज देत असून शेतकरी वर्गाला आकर्षित करत आहेत. उस्मानाबाद येथील हा प्रकार समोर आला आणि अनेक शेतकरी संघटना नाराज झाल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

होळीच्या दिवशी १,२४४ विशेष गाड्या चालवल्या जातील, रेल्वे मंत्रालयाची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तहसीलमधील कालव्यात झालेल्या कार अपघातात तीन जणांचे मृतदेह सापडले

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तेल कंपन्यांना डिझेल निविदेत हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला

एसटीची शिवशाही बस बंद होणार; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments