Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा गेला जीव

Webdunia
गुरूवार, 31 मार्च 2022 (11:31 IST)
राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा तडाखा बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
 
ही घटना अमळनेर तालुक्यातील मांडळात घडली असून जितेंद्र संजय माळी (वय 33) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉक्टरांप्रमाणे माळी यांचा मृत्यू उष्माघातासारख्या लक्षणांमुळे झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका खुलासा होणार आहे.
 
जळगाव जिल्ह्यात २७ ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची लाट येणाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. वाढत्या तापमानामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिला २६ आठवड्यांचा गर्भधारणेचा गर्भपात करू शकते; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

April New Rules : LPG, UPI ते Toll Tax... उद्यापासून हे मोठे बदल लागू होणार

खासदार अरुण गोविल यांनी सौरभ हत्येतील आरोपी मुस्कान आणि साहिल यांची भेट घेत दिले रामायण

प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारीच्या लॅम्बोर्गिनीने कामगारांना चिरडले

ठाणे: प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर १८ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments