Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रेकर्स तुमचा आवडता हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2019 (09:27 IST)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक वन अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली. शहराबरोबरच ग्रामीण व खास करून मुंबई येथील ट्रेकर्स पर्यटकांचे वर्षा सहलीचे हे आवडते ठिकाण आहे. इथे कायमच गिर्यारोहकांचीही गर्दी असते. मात्र काही हुल्लडबाजी करणारया पर्यटकांमुळे इतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यातही पावसाळयात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जिल्हाधिकारयांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसार दिलेल्या निर्देशाचा आधार घेत हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या रविवारी गडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली असती. मात्र सुदैवाने असे काही घडले नाही. या किल्ल्याच्या पायऱ्या अत्यंत अरुंद असुन एका वेळेस एकच माणूस चढू किंवा उतरू शकतो. याची दखल घेत यासाठी पावसाळ्यात हरिहर गडावर जाण्यास आपत्ती व्यवस्थापन उपाय योजना अंतर्गत प्रवेश बंद करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments