Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरमध्ये शेतकरी जोडप्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (10:07 IST)
लातूर तालुक्यात गादवड गावात धक्क्कादायक घटना घडली आहे. इथे एका अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बळीराम रावसाहेब कदम (50) आणि वैशाली उर्फ मंगलबाई बळीराम कदम असे या मृत दाम्पत्याचे नाव आहेत. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गादवड शिवारामध्ये या दोघांचे मृतदेह एका लिंबाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या दाम्पत्याने शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास सारसा रस्त्यावर असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा जरून अकस्मात मृत्यूची नोंद करून दोघाचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.नंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यात येतील. या घटनेमुळे  परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments