Festival Posters

राम कदम खाली बसा, अवनीने तुमचा नंबर घेतला नाही - जयंत पाटील

Webdunia
गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (08:36 IST)
विरोधक आणि सत्तधारी यांच्यात कलगीतुरा विधानसभेत पहायला मिळतो. मात्र कधी कधी जोरदार धक्का देखील देतात. असाच प्रकार आमदार राम कदम सोबत झाला आहे. अवनी वाघीण मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर यावेळी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले ‘प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रणा जंगलामध्ये पेरून देखील अवनी वाघिणीला तुम्ही ट्रॅन्क्वेलायझर न देता गोळ्या घातल्या’,अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मुनगंटीवार ऐकवल. त्याच वेळी आमदार राम कदम अवनी वाघीण प्रकरणावरूनच जयंत पाटील यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते.  पण विधान भवनामध्ये बोलण्याचा दांडगा अनुभव असलेल्या आणि कसलेल्या जयंत पाटलांनी एकाच मुद्द्यावर राम कदम यांचा अडथळा अगदी अलगद दूर सारला आहे. राम कदम बोलण्यात अडथळा आणत आहेत हे लक्षात येताच जयंत पाटील यांनी अवनी वाघिणीवरून थेट राम कदम यांच्या ‘फोन नंबर’ वक्तव्यावर उडी घेतली होती. राम कदम यांना सर्व आवेश बाजूला ठेऊन पुन्हा शांत होऊन जयंत पाटील यांचं भाषण ऐकत राहावं लागलं काय म्हणाले पाटील "जयंत पाटील म्हणाले….अध्यक्ष महोदय यांना खाली बसवा. अहो राम कदम, तुमचं कौतुक संपूर्ण महाराष्टट्र करतोय. अवनी वाघिणीने तुमचा फोन नंबर घेतला नाही, ही तुमची समस्या आहे. तुमचं कौतुक भाजपमधूनही होत आहे. त्याबद्दल तुम्हाला तोड नाही. तुम्ही खाली बसा.:"
राम कदम यांनी मुलींबरोबर लग्न करायचे मी लावून देतो त्यांना उचलून आणू असे कार्यकर्त्याना सांगितले होते सोबत माझा फोन घ्या असे वादग्रस्त आणि महिलांना अपमानित करणारे वक्तव्य केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पेट्रोल-डिझेलला पर्याय तयार! Tata Motors ची पहिली Flex Fuel कार भारतात लवकरच

केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले: ₹१,२३५ च्या दराला 'जखमेवर मीठ चोळण्यासारखे' म्हटले; आंदोलनाचा इशारा

LIVE: केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले

कोल्हापुरात हृदयद्रावक घटना; अडीच वर्षांपूर्वी ज्या घाटात पत्नी-मुलांना गमावले, त्याच ठिकाणी पुण्याच्या व्यक्तीने संपवले जीवन!

६५० गुण मिळण्याची अपेक्षा होती': NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चार वर्षांपासून करत होता परीक्षेची तयारी

पुढील लेख
Show comments