Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले’ - जयंत पाटील

Webdunia
शनिवार, 16 मार्च 2019 (09:15 IST)
काल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पुलाचा भाग कोसळला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन आहिर  यांनी जी. टी. रुग्णालयात जाऊन जखमींचा विचारपूस केली. या वेळी - जयंत पाटील म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाचे कळाले. ऑडिट करताना वरवर काम केल्यामुळे ही घटना घडली आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली, पण त्याने काही होत नाही. जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करून घ्यावे. अपघातानंतर महापालिका आणि रेल्वेने जबाबदारीची टोलवाटोलवी केली. मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. भाजपाने शिवसेनेला जाब विचारायला हवा. पण शिवसेनेचे पक्षाध्यक्ष युती करण्यातच गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यातच मग्न आहेत. म्हणूनच इथे यायला त्यांना वेळ झालेला नाही. मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले आहे.  असे पाटील   म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments