Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरीची बंपर भरती

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरीची बंपर भरती
Webdunia
सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:36 IST)
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरीची बंपर भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभागाच्या एकूण 3 हजार 466 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.यामध्ये ड गटासाठीच्या नोकरभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रक्रियेत पात्र असलेल्या उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीन अर्ज दाखल करावा लागणार आहे. तसेच येत्या 9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात होणार आहे. या संबधीत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या भरतीच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.तसेच उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
 
आरोग्य विभागात भरती प्रक्रियेमधून महाराष्ट्रातली अहमदनगर,धुळे,नाशिक,रायगड,पालघर,ठाणे,जळगाव, परभणी,जालना,सांगली,रत्नागिरी,कोल्हापूर,सोलापूर,सातारा पुणे,नंदुरबार,बुलडाणा,नांदेड,बीड,अकोला, उस्मानाबाद,लातूर,औरंगाबाद,हिंगोली,पुणे,चंद्रपूर,गोंदिया,वर्धा,गडचिरोली,भंडारा,नागपूर, वतमाळ,वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत.
 
भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.  9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही 22 ऑगस्ट 2021 ही आहे.वेबसाइट-arogya.maharashtra.gov.in
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात चेन स्नॅचर चेन्नई पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये ठार

LIVE: वर्धा जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायत क्षेत्रात 'आपले सरकार' केंद्रे स्थापन होणार

तीन मुलांचे मृतदेह त्यांच्या घरात रहस्यमय मृतावस्थेत आढळले

‘मनसेला शेवटचा इशारा…’,मराठी न बोलल्याने हिंदी भाषिकांना मारहाण केल्याबद्दल चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी संतप्त

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगाचे औरंगजेब आहे... शिवसेना नेत्याने विधानावरून गदारोळ

पुढील लेख
Show comments